नागपूर

कायदा प्रकाश आंबेडकरांची जागीर नाही : गिरीश व्यास 

सरकारनामा ब्युरो

नागपूर ः आमची सत्ता आल्यास दोन दिवस तरी सरसंघचालक मोहन भागवतांना तुरुंगात डांबू, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी औरंगाबाद येथे मुस्लीम समाजाच्या मेळाव्यात केले होते. त्यावर "कायदा प्रकाश आंबेडकरांच्या बापाची जागीर नाही', असे विधानपरीषद सदस्य आणि भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीष व्यास "सरकारनामा'शी बोलताना म्हणाले. 

बिहारच्या एका खासदाराकडे एके-47 सापडल्यामुळे त्याला तुरुंगात डांबण्यात आले आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे एके-47 सारखी घातक शस्त्रे असुनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. खरे तर भागवतांना तुरुंगात डांबले पाहीजे. कारण कायदा हा बिहारच्या खासदारासाठी, सामान्य माणसासाठी आणि मोहन भागवतांसाठी एकसमान आहे, असे आंबेडकर म्हणाले होते. त्यावर आमदार व्यास यांनी ही प्रतिक्रीया दिली. 

कायदा आपले काम बरोबर करतो. आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये कुणावरही अन्याय होणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहे. त्यामुळे त्यांनी अशी चिल्लर आणि थिल्लर कामे करु नये. केवळ लोकप्रियतेसाठी करीत असतील तर अजिबातच करु नये. अशा स्टेटमेंट्‌सनी त्यांना लोकप्रियता मिळणार नाही. लोकप्रियता मिळवायची असेल तर त्यासाठी चांगली कामे करावी, असा सल्लाही आमदार व्यास यांनी आंबेडकरांना दिला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT